जळगावमहाराष्ट्र

पारोळ्याच्या जवानाला श्रीनगर येथे वीरमरण.!!!

पारोळ्याच्या जवानाला श्रीनगर येथे वीरमरण.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – येथील शेवडी गल्लीतील रहिवाशी सीआरपीएफ जवान जितेंद्र देविदास चौधरी यांना श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.त्यांच्या निधनाने संपूर्ण शेवडी गल्लीसह शहर परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर आज बुधवारी ५ रोजी दुपारी कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

१०२ आरएएफ बी/११७ बटालियन मधील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी हे श्रीनगर येथे कर्तव्य बजावत होते. मंगळवारी ४ रोजी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन अकस्मात निधन झाले. श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले,तेथून पार्थिव हे पारोळा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.आज बुधवारी जवान जितेंद्र चौधरी यांची अंत्ययात्रा शेवडी गल्ली येथून निघुन भवानी चौक,श्रीराम चौक,रथ चौक,क्रांती चौक,वाणी मंगल कार्यालय,आझाद चौक मार्गे महामार्गालगत कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर दुपारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात तीन भाऊ,एक बहीण,दोन लहान मुली (अडीच वर्षांची व आठ महिन्यांची) असा परिवार आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!