जळगावसामाजिक

वाडे येथे तिरंगा रॅली याञेने जागली देशभक्ती.!!!

वाडे येथे तिरंगा रॅली याञेने जागली देशभक्ती.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

सीमेच्या संरक्षणासाठी अहोराञ आपल्या जीवाची बाजी लावणार्या जवानांच्या सन्मानार्थ व आॅपरेशन सिंदुरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ व हर घर तिरंगा अभियानांतर्गत भडगाव तालुक्यातील वाडे येथे गावातुन दि. १४ रोजी गुरुवारी सकाळी तिरंगा रॅली याञा काढण्यात आली. या रॅलीत नागरीक, माध्यमिक विदयालय व इंग्लीश मेडीयम स्कुलचे विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने सहभागी होते. याञामुळे देशभक्ती जागल्याचा उत्साह दिसुन आला. या रॅली याञेस उत्सफुर्त तरुण, नागरीकांचा सहभाग लाभला. रॅली याञेचा शुभारंभ माध्यमिक विदयालयापासुन झाला. गावातुन ढोलताशाच्या गजरात तिरंगा रॅली याञा काढण्यात आली. या तिरंगा रॅली याञेत आजी माजी सैनिक, नागरीक, तरुण मंडळी, विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षक मोठया संख्येने सहभागी होते

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!