जळगावराजकीयसामाजिक

यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र शांताराम आचारी यांनी केली आहे.

याबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, यशवंत नगरमधील बजरंग चौक, मारोती मंदिर परिसर तसेच विलास पाटील यांच्या घराजवळील चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा असून, दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.

विशेषतः वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील रहिवासी या मार्गाचा दैनंदिन वापर करीत असून, अलीकडच्या काळात येथे दुचाकी चोरीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यास गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल, गुन्हेगारांवर वचक राहील तसेच पोलिस तपास कार्यास मदत होईल, असा विश्वास आचारी यांनी व्यक्त केला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांचाही पाठिंबा असून, पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!