जळगावसामाजिक

वाडे मुक्कामे बस ५ ते ६ दिवसापासुन बंद.पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांचे भडगाव व पाचोरा आगारास निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

बंद बस सुरु करण्याची मागणी.भडगाव ते वाडे मुक्कामी एस. टी. बस ५ ते ६ दिवसापासुन काही कारणास्तव एस. टी. महामंडळाने अचानक बंद केलेली आहे. तरी वाडे मुक्कामी बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.प्रवाशांसह विदयार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन वाडे येथील नागरीक व दै. लोकमतचे पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक व पाचोरा आगारा प्रमुखांना दि. ३१ रोजी सायंकाळी ७ वाजता दिलेले आहे. यावेळी वाहतुक निरीक्षकांना भेटुन चर्चा केली. व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांना मुक्कामी बस बंदमुळे होणार्या हाल व ञास याबाबत व्यथा मांडल्या. व मुक्कामी बस फेर्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

भडगाव व पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, मी वाडे गावामार्फत प्रवाशी व विदयार्थी वर्गामार्फत नम्र विनंती करतो कि, आमचे गावाचे बस चालक व वाहकांना नेहमी सहकार्य असते. आमच्या वाडे गावाला भडगावच्या बसस्थानकातुन मुक्कामे येणारी बस काही कारणास्तव बंद करुन ५ ते ६ दिवस होत आहेत. मुक्कामे बस फेर्या बंद झाल्यामुळे प्रवाशी,

विदयार्थ्यांचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. वाडे गावात मुक्कामे बस न जाता गोंडगाव पर्यंतच बस जाते. गोंडगावहुन वाडे, बांबरुड प्र.ब, नावरे आदि गावांना जाण्यासाठी वृद्ध मंडळी, नागरीक, प्रवाशी, विदयार्थ्यांना ७ ते ८ कि. मी. अंतर पायी जाऊन अंधारात प्रवास करावा लागत आहे.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आठवडयात बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु होणार आहेत.तरी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. प्रवाशांना प्रवासाचा ञास होणार नाही. याची काळजी घ्यावी. संपुर्ण वाडे गावाच्या नागरीकांची मागणीची दखल घ्यावी.तात्काळ भडगाव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करावी ही विनंती आहे. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांची सही आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!