जळगावनिवडणूक

भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ पाचव्या दिवशी अर्ज दाखल प्रक्रियेला मर्यादित प्रतिसाद नगराध्यक्षा पदाकरिता एकही अर्ज नाही; नगरसेवक पदासाठी ५ अर्ज दाखल

भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ पाचव्या दिवशी अर्ज दाखल प्रक्रियेला मर्यादित प्रतिसाद

नगराध्यक्षा पदाकरिता एकही अर्ज नाही; नगरसेवक पदासाठी ५ अर्ज दाखल

भडगाव प्रतिनिधी :-

आगामी भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात राहिली असली तरी पाचव्या दिवशीही वातावरण शांतच दिसून आले. विशेष म्हणजे, नगराध्यक्षा पदाकरिता आजदेखील एकही अर्ज दाखल झाला नाही, तर नगरसेवक पदासाठी ५ उमेदवारांनी एकूण ५ अर्ज दाखल केले.

निवडणूक विभागाकडून सायंकाळी जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार प्रभागनिहाय अर्जांची नोंद पुढीलप्रमाणे झाली:

आज (१४ नोव्हेंबर) दाखल झालेले नगरसेवक पदाचे अर्ज

प्रभाग क्र. ८-अ

पाटील पुनम प्रशांत — २ अर्ज

प्रभाग क्र. ९-ब

पाटील योजना दत्तात्रय — १ अर्ज

प्रभाग क्र. १-ब

पाटील संतोष अर्जुन — १ अर्ज

प्रभाग क्र. ११-ब

भोई पुष्पाबाई अशोक — १ अर्ज

कालपर्यंतचे व आजचे मिळून एकूण अर्ज

नगराध्यक्षा पदाकरिता एकूण अर्ज : ०

नगराध्यक्षा पदासाठी एकूण उमेदवार : ०

नगरसेवक पदाकरिता एकूण अर्ज : ६

नगरसेवक पदासाठी एकूण उमेदवार : ५

निवडणूक वातावरणात ‘प्रतीक्षा’ आणि ‘समन्वय’चे संकेत

नगराध्यक्षा पदासाठी एकही अर्ज न दाखल होणे हे भडगावमधील राजकीय चर्चांचे प्रमुख केंद्र बनले आहे. स्थानिक नेत्यांमध्ये अद्याप अंतिम तडजोड, उमेदवार निश्चिती किंवा आंतर्गत राजकीय समन्वय सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मोठे चेहरे किंवा नवे दावेदार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक पदासाठी दाखल झालेले अर्जही प्रभागनिहाय मर्यादित असून, अनेक संभाव्य उमेदवार अजूनही परिस्थितीचा अंदाज घेत असल्याचे दिसत आहे.

पुढील काही दिवस निर्णायक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप काही दिवसांची मुदत शिल्लक आहे. राजकीय गट, पॅनेल आणि स्वतंत्र उमेदवार हातात असलेली पत्ते अद्याप उघड करत नसल्याने शेवटच्या टप्प्यात अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!