क्रीडामहाराष्ट्रराजकीय

भव्य क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जयंतराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.!!!

भव्य क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जयंतराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष मा. आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभ्युदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबईतील नामवंत क्रिकेट संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस बबनराव कनावजे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मुंबईचे जनरल सेक्रेटरी उमेश येवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या अध्यक्ष राखीताई जाधव उपस्थित होत्या. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत आयोजकांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. स्पर्धेचं विजेतेपद मुंबईचा राजा रथाधिश, काळाचौकी तर उपविजेतेपद श्रीजा इलेव्हन, लालबाग यांनी पटकावले.

 

स्पर्धेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, बॉडी बिल्डर अनिल राऊत, सिने छायाचित्रकार सचिन खामकर, आयुर्विमा कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष मोरे, अविनाश आवळेगावकर आणि शरद दाभाडे यांचा समावेश होता.

 

स्पर्धेला दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे, तालुकाध्यक्ष प्रवीण खामकर, सुनील वराडकर, महाराष्ट्र सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई सचिव प्रशांत जावकर, वैशाली ताई कडणे, राजेश बनसोडे’ कल्पना शेटे, महिला जिल्हाध्यक्ष वनीता तोंडवलकर, महिला तालुकाध्यक्ष भारती पाटील, लता मोहिते, क्षमा हिरे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत भोगले, अमर कांबळे, अरविंद घाडगे, विजय कानडे, विनायक भंडारे, विनोद परब, किशोर पाटील, संतोष नार्वेकर, संतोष वराडकर, दिलीप खोंड, वसंत यादव, रमेश बोरचटे, नवनाथ पाटील, किरण जाधव, अक्षय मोरे, सत्या यादव आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवनाथ गाढवे, इसरार खान, राजेंद्र खानविलकर, रवींद्र कदम, तुषार पाटेकर, अनंत घोगळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

 

ही भव्य क्रिकेट स्पर्धा खेळाडूंना संधी मिळवून देण्यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि ऊर्जा निर्माण करणारी ठरली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!