महाराष्ट्रराजकीयविशेष

लाडक्या बहीणींचे पैसे परत घेणार का.? अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर.!!!

लाडक्या बहीणींचे पैसे परत घेणार का.? अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर.!!!

 

लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी सुरू झाली असून अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावरून महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले होते. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी काही महिला स्वत:हून पैसे परत करत आहेत.

त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करण्यात येतीलअसे म्हटले होते. तटकरे यांच्या या विधानामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.

 

मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अपात्र लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का? याचे पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. त्यामुळे या राज्यातील सर्वच लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील काही काळापासून लाडक्या बहि‍णींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकावर टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं.

अजित पवार यांनी केलं स्पष्ट

पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लाडक्या बहिणींकडून पैशाची रिकव्हरी करणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी दिले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!