जळगावसामाजिक

मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :–

दिनांक 10 डिसेंबर 2025, जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेतर्फे भडगाव पोलीस स्टेशन येथे एक भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनीष भिला सोनवणे यांना भ्रष्टाचार निवारण विभागाचा अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.

नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा मान भडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. महेशजी शर्मा साहेब यांना मिळाला. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर सोनवणे यांनी संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महेशजी मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त व न्यायप्रणाली बळकट करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात संघटनेचे अन्य पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवर म्हणून उपस्थित होते —

महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष: शेख शकील शेख बाबू

पदाधिकारी: संजय अभिमान पाटील, जयदीप पाटील

भडगाव पोलीस स्टेशनचे एस.आय.: भूषण पाटील

गुप्तचर विभाग: निलेश बामनकर

मानवाधिकार कार्यकर्ते: भालचंद्र देशमुख

तसेच तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी व मान्यवर नागरिक.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी भ्रष्टाचार निर्मूलन, नागरिकांचे हक्क, तसेच समाजातील पारदर्शकता टिकविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. मानवाधिकार दिनाचे महत्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि सामाजीक बांधिलकीची भावना वाढविणारा ठरला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!