जळगावनिवडणूक

निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी — योजनाताई पाटील प्रभाग ९ मधून निवडणूक रिंगणात.!!!

निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी — योजनाताई पाटील प्रभाग ९ मधून निवडणूक रिंगणात.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यात सामाजिक कार्याची भक्कम परंपरा निर्माण करणाऱ्या मा. नगरसेविका सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या लोकाभिमुख कामांमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांची ओळख विश्वासार्ह व सक्रिय जननेत्या म्हणून झाली आहे. निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांशी सतत जोडून राहण्याची त्यांची कामाची पद्धत विशेषत्वाने पुढे येते.

निराधार, गरजू, वंचित अशा घटकांसोबतच विद्यार्थी, महिला आणि वरिष्ठ नागरिकांच्या समस्यांवर योजनाताईंनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास अनेकांना दिलासा देणारा ठरला आहे.

प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा यांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींवर त्यांनी स्वतः स्थळी भेट देऊन उपाययोजना केल्या. संबंधित विभागांशी चर्चा करून अनेक तातडीच्या समस्यांचे निवारण केल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

महिला सक्षमीकरण, आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच नागरिकांच्या अडचणींसाठी कोणत्याही वेळी उपलब्धता या उपक्रमांमुळे त्यांचा लोकसंपर्क अधिक दृढ झाला आहे.

येत्या नगरपरिषद निवडणुकीत सौ. योजनाताई पाटील प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी अर्ज करीत असून, त्यांच्या कार्याचा आलेख व साधी, सहज उपलब्ध राहण्याची कार्यशैली यामुळे नागरिकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला गती येत असून विविध समाजघटकांचा पाठिंबा त्यांना लाभत आहे.

सौ. पाटील यांनी, “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे काम अखंडपणे करणार,” असे सांगितले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक यंदा रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!