शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा महत्त्वाची

41

शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा महत्त्वाची

 

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सकस आहार पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.

 

मंत्री भुसे  यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आहाराच्या गुणवत्तेसह सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिक्षणाच्या हक्क कायद्याअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 5 वी व 8 वीच्या परीक्षा, शिक्षक भरतीतील बदल, शाळांच्या पुनर्रचना, विशेष मुलांसाठी शिक्षकांच्या पदनिर्मिती, आणि आदर्श शाळांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले.

 

या बैठकीत शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गणवेश, पुस्तके, आहार, अपघात विमा, शैक्षणिक साहित्य, शुल्क प्रतिपूर्ती, ई-गव्हर्नन्स, ‘मुख्यमंत्री – माझी शाळा, सुंदर शाळा’, आणि शिष्यवृत्ती यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीस प्रधान सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त सुरज मांढरे, व इतर अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा पुरवण्यावर भर देत शासनाने शालेय व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा