Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 5

गोंडगाव विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी.!!!

0

गोंडगाव विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री.बी. जी. ननावरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे सर हे होते. सुञसंचालन इयत्ता नववीच्या विदयार्थीनी सायली पाटील व प्राची पाटील यांनी केले. तसेच यावेळी विदयालयातील मुला, मुलींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. आर. महाजन या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. दत्तु मांडोळे, श्री. मनोज पाटील हे ही कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी श्री. दत्तु मांडोळे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षिय मनोगतातुन विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर अनमोल असे विचार मांडले.आभार श्री. एस. डी. चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी.जी. ननावरे, श्री. सी. एस. सोन्नीस, श्री. एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. आर. पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. पी. व्हि. सोळंके, श्री. बी. डी. बोरसे, श्री. एस. एस. आमले, श्री. आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, श्री. एन. ए. मोरे, श्री. पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल. मोरे, श्री. व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर.भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

0

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर.भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

 

भडगाव प्रतिनिधी :-

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड, भडगाव येथे संपन्न झाली.

या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचीत भडगाव तालुका अध्यक्ष पदी विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष पदी पंकज पाटील, सचिवपदी नरेंद्र तुळशीराम भोसले, कार्याध्यक्षपदी अमीन पिंजारी, तालुका संघटक पदी आत्माराम पाटील, सहसचिव लक्ष्मण पाटील, संपर्कप्रमुख निलेश पाटील तसेच शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे, सल्लागार पदी अशोक परदेशी यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारीणी सदस्य शरद पाटील, दिलीप पाटील, गणेश शिवराम अहिरे, किशोर वराडे, संजय कोतकर, आनंद महाजन, रवींद्र पाटील, आबा बैरागी, रविंद्र जुगराज पाटील, संजय सोनार , प्रमोद बैरागी आदींची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सहसंघटक संजय महाजन उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र पाटील, सतीष मधुकर पाटील सहकार्य लाभले.

यावेळी सर्व उपस्थित पञकार पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते श्री.साईबाबांची आरती करण्यात आली. श्री.साईबाबांचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. तसेच येणाऱ्या ६ जानेवारी २०२६ पत्रकार दिनानिमित पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच संघटना बांधणीतसाठी चर्चा करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांनी सर्व नूतन पदाधिकारी व सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

या बैठकीत सुचक अशोक परदेशी यांनी व अनुमोदक म्हणून नरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेवाळे यांनी केले तर आभार पंकज पाटील यांनी मानले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऊर्जा दीदी’; ग्रामीण महिलांच्या हातून सौरऊर्जेचा विस्तार

0

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऊर्जा दीदी’; ग्रामीण महिलांच्या हातून सौरऊर्जेचा विस्तार

पाचोरा–भडगाव तालुक्यात घराघरावर सौरऊर्जेचा उजेड

पाचोरा  भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा व भडगाव तालुक्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘ऊर्जा दीदी’ या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत असून महिलांना रोजगार, स्वावलंबन व सामाजिक सन्मान मिळत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

रूट (ROOT) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या ऊर्जा दीदी घराघरात जाऊन सौरऊर्जेबाबत जनजागृती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल पाटील यांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या बसविण्यात आला. काही दिवसांपूर्वी तांत्रिक पथकातील तंत्रज्ञ अजय यांनी ऊर्जा दीदींसह विठ्ठल यांच्या घराच्या छताची पाहणी केली. छताची मजबुती, सावलीची अडचण व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

यानंतर ऊर्जा दीदींनी विठ्ठल यांच्या पत्नी लक्ष्मी यांना सौर सिस्टिमचा खर्च, शासनाकडून मिळणारी सबसिडी, बँक कर्जाची सोपी प्रक्रिया तसेच भविष्यात वीजबिलात होणारी मोठी बचत याबाबत सविस्तर माहिती दिली. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर ही गुंतवणूक घरासाठी फायदेशीर असल्याची खात्री पटल्याने विठ्ठल व लक्ष्मी यांनी सोलर सिस्टिमची ऑर्डर निश्चित केली.

संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने करण्यात आला. पेमेंट केल्यानंतर अधिकृत पावती देण्यात आली. ऊर्जा दीदींच्या प्रामाणिक व विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे.

काही दिवसांतच विठ्ठल यांच्या घरासाठी लागणारे सौर पॅनल व इतर साहित्य घेऊन मोठा ट्रक गावात दाखल झाला. राहुल या डिलिव्हरी कर्मचाऱ्याने साहित्य उतरवले. ऊर्जा दीदी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक साहित्याची तपासणी करून खात्री करून घेतली.

त्यानंतर इन्स्टॉलेशनचे काम सुरू झाले.अजय व त्यांच्या पथकाने सर्व सुरक्षा नियम पाळत हेल्मेट व सेफ्टी बेल्टचा वापर करून छतावर सौर पॅनल बसवले. ऊर्जा दीदी खाली उभी राहून संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून होत्या. सर्व जोडण्या पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी यांना मुख्य स्विच सुरू करण्यास सांगण्यात आले. स्विच ऑन होताच घरात सौरऊर्जेवर वीजपुरवठा सुरू झाला. त्या क्षणी लक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.

काम पूर्ण झाल्यानंतर ऊर्जा दीदींनी पॅनलची स्वच्छता, देखभाल व काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल क्रमांकही दिला.

दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की,“महिला सक्षमीकरण केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवायचे आहे. महिलांना रोजगार, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास मिळाल्यास त्या स्वतःचा व समाजाचा विकास करू शकतात. पाचोरा–भडगाव तालुक्यातील प्रत्येक घरावर सौरऊर्जा पोहोचवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.”

या उपक्रमासाठी संपुर्ण सोलराईज प्रा. लि. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.प्रशांत जाधव तसेच ॲड.दिपक बोरसे पाटील, श्री.विशाल सावकारे ,सौ. कामिनी पाटील यांनी ROOT (मूळ), ऊर्जा दीदी योजने संबंधी संकल्पना मांडली आणि तांत्रिक माहिती दिली त्यासाठी श्री. मयूर पाटील,संदीप पाटील,धीरज पाटील, चेतन पाटील,.विवेक बडगुजर,जमाल एस कासार ,आकाश कोळी यांनी सहकार्य केले.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना नवे उत्पन्नाचे साधन मिळत असून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढत आहे. ऊर्जा दीदींनी ग्रामीण महिलाही तंत्रज्ञानाच्या मदतीने घराघरात उजेड निर्माण करू शकतात, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.

भडगावमध्ये महिलाराज्याचा ऐतिहासिक अध्याय”नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्यात महिला सशक्तीकरणाचा ठाम निर्धार.!!!

0
0-3840x2160-2-0-{}-0-12#

भडगावमध्ये महिलाराज्याचा ऐतिहासिक अध्याय”नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्यात महिला सशक्तीकरणाचा ठाम निर्धार.!!!

भडगाव |प्रतिनिधी :-

भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्याने भडगावच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय रचला. सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता आणि कोणत्याही पुरुषांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

 

या सोहळ्यास आमदार किशोर आप्पा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभाऊ पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक-नगरसेविका, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार उपस्थित होते.

 

महिलांचे नेतृत्व – भडगाव व पाचोर्‍यात महिलाराज्य

 

यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा यांनी सांगितले की, पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये महिलाच नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या असून हा महिलांच्या सामाजिक व राजकीय सशक्तीकरणाचा मोठा विजय आहे.

“जर सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली नसती, तर आज महिला नगरसेविका आणि नगराध्यक्ष दिसल्या नसत्या,” असे त्यांनी नमूद केले.

महिला बचत गटांसाठी शाश्वत उत्पन्नावर भर

महिला बचत गटांच्या कार्याबाबत बोलताना आमदार किशोर आप्पा म्हणाले की, वडे-पापड, शेवया, मसाले यांसारखे उद्योग महत्त्वाचे असले तरी त्यापुरते मर्यादित न राहता महिलांना दरमहा किमान १० ते १५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळेल असे नवे रोजगार मॉडेल उभे करणे आवश्यक आहे.

जळगाव येथे महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खाऊ गल्ली’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी भडगावमध्येही महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.

‘ऊर्जा दीदी’ उपक्रमातून रोजगार

महिलांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवण्याच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाकडून सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. उर्वरित कामातून महिला बचत गटांना थेट उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘लखपती दीदी’ घडवण्याचा संकल्प

“प्रत्येक महिला बचत गट आणि प्रत्येक दीदी लखपती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार किशोर आप्पा यांनी व्यक्त केला. महिलांमध्ये काम करण्याची तयारी, कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास असल्यास त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अशक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भडगावकर जनतेचे अभिनंदन

या निवडणुकीत जाती-धर्माच्या राजकारणाला नकार देत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करणाऱ्या भडगावकर जनतेचे आमदार किशोर आप्पा यांनी विशेष अभिनंदन केले.

“झोपडीत राहणाऱ्या एका सामान्य महिलेला भडगाव शहराच्या नगराध्यक्षपदी बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय जनतेने घेतला आहे,” असे ते म्हणाले.

विकासाची ग्वाही

नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील व सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक, प्रामाणिक व विकासाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली.

या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यामुळे भडगावमध्ये महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली असून महिला सशक्तीकरणाचा संदेश संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे.

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

0

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य व ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोरा–भडगावचे आमदार ना. किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ललिता ताई पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, गटनेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत जनतेच्या विश्वासावर ऐतिहासिक विजय मिळवला. विविध पक्षांनी एकत्र येऊनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना रोखण्यात अपयश आले. शिवसेनेला पाचोरा नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “हा विजय दादागिरीचा किंवा सत्तेच्या मस्तीचा नसून विकास, विश्वास आणि शांततेचा विजय आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात अशी कामगिरी करावी की पुढील निवडणुकीत नागरिक स्वतः त्या नगरसेवकाची मागणी करतील.” त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत महिला बचत गटांसाठी ‘ऊर्जा दीदी’ सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती दिली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “या विजयामध्ये ८० टक्के योगदान महिलांचे आहे,” असे सांगत त्यांनी पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाचोरा शहराला मुबलक आणि शुद्ध पाणी देणारी नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या विजयाचे अभिनंदन करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “राज्य शासनाच्या माध्यमातून पाचोरा शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या पदग्रहण सोहळ्यात महिला बचत गटांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक स्वावलंबनाच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बँक कर्ज, शासकीय अनुदान व प्रत्यक्ष कामाच्या संधी उपलब्ध करून महिलांना सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-भगिनी, शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर शिवसेनेच्या घोषणांनी व जल्लोषाने दुमदुमून गेला. पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात हा पदग्रहण सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील भडगाव नगरपालिकेचे गटनेते.!!!

0

शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील भडगाव नगरपालिकेचे गटनेते.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ऐतिहासिक विजयामागे प्रभावी निवडणूक व्यवस्थापन, अचूक रणनीती आणि मजबूत संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरले असून, त्यात नगरसेवक लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.

निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन, उमेदवारांचा समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी तसेच कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम लखीचंद पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. याचा थेट लाभ शिंदे सेनेला मिळाला असून नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे भडगाव नगरपालिकेत शिवसेनेने ऐतिहासिक विजय नोंदविला आहे.

भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत लखीचंद पाटील यांनी एक सकारात्मक व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. याच जनाधाराचा लाभ पक्षाला निवडणुकीत मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नगरपालिकेतील गटनेता हा पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे, सर्वसाधारण सभा व समित्यांमध्ये पक्षाची भूमिका मांडणे, विकासकामांबाबत धोरण निश्चित करणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय ठेवणे तसेच नगरसेवकांच्या समस्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या गटनेत्यावर असतात.

गटनेतेपद हे मानाचे तसेच अत्यंत जबाबदारीचे पद असून, आगामी काळात भडगाव नगरपालिकेच्या कारभारात लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल आणि शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे साधनाई कलाविष्कार महोत्सव जल्लोषात संपन्न

0

भडगाव प्रतिनिधी:-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे नानासाहेब प्रतापराव हरि पाटील व डॉ.सौ.पुनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रेरणेने शाळेत साधनाई कलाविष्कार महोत्सव जल्लोषात संपन्न झाला. सर्वप्रथम अंश तहसीलदार व संकेत वाघ या आदर्श कन्या शाळेच्या दुर्घटनेतील विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लाडकुबाई शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे, रावसाहेब पाटील गटशिक्षणाधिकारी भडगाव, राजेश साळुंखे केंद्रप्रमुख भडगाव, श्री सुभाष सुपडु पाटील स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन भडगाव, श्रीमती वैशाली शिंदे प्राचार्या भडगाव,श्री एन.जी. पाटील मुख्याध्यापक महिंदळे, श्री एस.डी.पाटील मुख्याध्यापक शिंदी, श्री रवींद्र वळखंडे मुख्याध्यापक आमडदे माध्यमिक, श्री विलास पाटील मुख्याध्यापक आमडदे प्राथमिक, श्री अनिल पवार मुख्याध्यापक कोळगाव, श्री सुनील पाटील उपमुख्याध्यापक लाडकुबाई माध्यमिक, श्री निलेश तिवारी तालुकाध्यक्ष वकील संघ भडगाव, श्री बी.एन. पाटील मुख्याध्यापक अंजनविहिरे, श्री संदीप सोनवणे मुख्याध्यापक भातखंडे, श्री एस. पी. पाटील मुख्याध्यापक गिरड, श्रीमती विद्या पवार प्राचार्या इंग्लिश मीडियम भडगाव, सचिन सोमवंशी, दगडू सोनवणे, कोमल पाटील, गायत्री सोनार, प्रदीप राजपूत, मनोज माळी, ललित पाटील, दीपक पाटील, विकी नाना, प्रमोद सैंदाणे, दिलीप ठाकरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

मनस्वी अभिजीत सिसोदे, यशराज सचिन पाटील, निर्भय भास्कर तायडे, ममता सुनील पाटील,ओम निलेश तिवारी या विद्यार्थ्यांचा मंचावरील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आदर्श विद्यार्थी सन्मान सोहळा

अमन शेख, इशिता बडगुजर, रु्ही सैंदाणे,अंशरा मिर्झा, सानवी शिंदे, वेदांत ठाकरे, पूर्वा वाघ, मयुरी गुरव, प्रिन्स चव्हाण या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन आदर्श विद्यार्थी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हस्तलिखित बालरंग प्रकाशन सोहळा

मंचावरील मान्यवरांच्या हस्ते लाडकुबाई शाळेतील चिमुकल्यांचे बालरंग हस्तलिखित संकलित लेखांचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक केले. व लाडकुबाई शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.

रोमहर्षक आकर्षक नृत्यविष्कार

आई भवानी, झुकू झुकू गाडी, देशभक्तीपर गीते, पुष्पा मिक्स, वाडी वाडी ये, गोविंदा थीम, लाल ओढणी वाली, शकुंतला बाई मिक्स, बाप तो बाप रहेगा,सुंदरी सुंदरी, पंजाबी सॉन्ग, पावरी रिमिक्स, छावा नाट्य व नृत्य इत्यादी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यविष्कार सादर केला व उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनीता देवरे,अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, सचिन पाटील,हरिचंद्र पाटील,किरण पाटील, व शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या गंभीर जखमी.अर्ध्या तासात चार हल्ले; महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न.!!!

0

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या गंभीर जखमी.अर्ध्या तासात चार हल्ले; महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न.!!!

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांचा संताप, प्रशासनावर टीकेची झोड

.भडगाव ता.प्रतिनिधी : – आमीन पिंजारी

कजगाव शहरात गुरुवारी सायंकाळी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जैन मंदिर चौक व परिसरात अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत कुत्र्याने केलेल्या सलग हल्ल्यांत दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून दोन महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे कजगावमध्ये भीती, संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील फळविक्रेते अनिस मण्यार यांची आठ वर्षांची कन्या कशफिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हाताला चावा घेतला. रक्तस्राव होऊन ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कजगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.

या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्याच परिसरात घरासमोर खेळत असलेल्या समृद्धी सचिन भोसले (वय ५) या चिमुकलीवर त्याच कुत्र्याने हल्ला केला. तिच्या हाताला व पायाला चावा घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली. तिला तत्काळ चाळीसगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही कुत्र्याने हल्ला चढविला. मात्र, नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने त्या थोडक्यात बचावल्या. याच सुमारास आणखी एका महिलेवरही कुत्र्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दोन ते तीन तासांच्या कालावधीत तीन ते चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली.

कजगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तातडीने मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

0

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

रावेर प्रतिनिधी

शहरातील डी.एम. मॅरेज हॉल समोर असलेल्या शाळा परिसरात महावितरणच्या विद्युत तारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या लोंबकळत्या तारांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे. महावितरणच्या सर्व्हिस लाईनच्या विद्युत तारा तब्बल १० ते १५ फूट खाली लोंबकळत असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे.

या रस्त्यावरून दररोज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. मात्र लोंबकळलेल्या तारांमुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्याच्या झोतासोबत या तारा जोरजोरात हलताना दिसतात. कधीही तुटून खाली पडतील, अशी धास्ती नागरिक व्यक्त करीत आहेत.

काही ठिकाणी तारा इतक्या खाली आहेत की उंच वाहन गेल्यास थेट संपर्क येण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे जीवघेणा अपघात घडू शकतो. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीकडे स्थानिक नागरिक व पालकांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महावितरणच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. शाळा परिसर असल्याने येथे लहान मुले, मुली, पालक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असताना महावितरणकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.अपघात घडण्याची वाट न पाहता महावितरण व प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून लोंबकळलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी व त्या सुरक्षित उंचीवर नेाव्यात, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या दरम्यान पत्रकार शेख शरीफ यांनी स्वतः महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोन  दिवस सातत्याने फोन करून शाळा परिसरात लोंबकळलेल्या विद्युत तारांची माहिती दिली व तातडीने तारांची उंची वाढवण्याची मागणी केली. मात्र तरीही महावितरणकडून कोणतीही हालचाल न झाल्याने “पत्रकारांचा फोन करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

0

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा  दाखल

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना ३० तारखेला घडली. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील ऊर्फ आबा याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली. रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरड–मांडकी रस्त्यावर गिरणा नदीकडून येणारे एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाळूने भरलेले आढळून आले. वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र चालकांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

थोड्याच वेळात घटनास्थळी २० ते २५ अनोळखी इसम जमा झाले. दरम्यान पोलिस मदतीसाठी पोलीस कर्मचारी दाखल झाले असताना,काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या रितेश पाटील ऊर्फ आबा (रा. पाचोरा) याने महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धमकी दिली, धक्काबुक्की केली तसेच वाहन जप्तीला विरोध केला. त्याच्या साथीदारांनीही आरडाओरड, शिवीगाळ करत पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने जमाव पळून गेला.

यानंतर महसूल व पोलिस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली. जप्त मुद्देमालात १५ लाखांचे जेसीबी, २ लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर व किन्ही, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर व त्यातील वाळू असा एकूण ३७.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. अवैध वाळू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!