Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 4

भडगावमध्ये समाजप्रबोधनाचा जागर; गोविंद महाराजांच्या भारूडाने भ्रष्टाचारावर प्रहार,भडगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.!!!

0

भडगावमध्ये समाजप्रबोधनाचा जागर; गोविंद महाराजांच्या भारूडाने भ्रष्टाचारावर प्रहार,भडगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.!!!

​ भडगाव प्रतिनिधी :-

लोकशाहीत मतदार हा केवळ मत देणारा नसून तो सत्तेचा खरा राखणदार आहे, हा संदेश देत. देवाची आंळदी येथिल गोविंद महाराज यांनी ‘विनोदातुन समाज प्रबोधन’ करत एक वैचारिक विचार व विनोदाचा संगम साधत अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारूडाच्या कार्यक्रमाने जनमानसात विचारांची ठिणगी पेटवली. कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय प्रांगणात झालेला हा कार्यक्रम सामाजिक भान आणि जनजागृतीचा नवा अध्याय ठरला.

​ प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज (देवाची आळंदी) यांनी आपल्या धारदार भारूडातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घातला. भ्रष्टाचार, राजकीय उदासीनता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी परखड शब्दांत प्रहार केला. “जनतेने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे,” असे आवाहन करत त्यांनी लोकशाहीचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून देत भारूडातून ‘दांभिकतेवर’ ताशेरे ओढले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात लोटपोट हसत दाद दिली.

​ *नवनिर्वाचित नगराध्यक्षा सह मान्यवरांचा गौरव*

​ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने होते. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र तथा पाचोरा गट नेते सुमित पाटील, भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा, ​रेखा प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील, विजय महाजन (जळगाव), जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय पवार, तालुकाध्यक्ष जावेद शेख, पत्रकार सुनिल पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील सह पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी संपादक हेमंत अलोने यांच्या हस्ते नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, गोविंद महाराज याचा सत्कार तर पत्रकार दिलीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​ *पत्रकारितेचे सामाजिक दायित्व*

​ भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे. “एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक प्रबोधनासाठी एकत्र येणे, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे,” असे मत जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचलन व आभार शिक्षक योगेश शिपी यानी केले.

———————-चौकट—————–

*पत्रकार दिनी आरोग्य सेविकाचा सन्मान*

भडगाव तालुका पत्रकार संघ पत्रकार दिनी विविध उपक्रम राबवित असतो. यावर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिसी उपविभाग अधिकारी विजय ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य सुनिल पाटील, विलासराव नेरकर, डॉ. समाधान वाघ, बाळासाहेब महाजन, जेष्ठ पत्रकार संजय पवार, जावेद शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार सुनिल पाटील याची कन्या तेजस्विनी पाटील हीने वैद्यकीय क्षेत्रात बीएएमएस पदवी प्राप्त केल्याने तर साधनाई पुरस्कारची हॅट्रीक प्राप्त दर्शन पाटील याचा सन्मान करण्यात आला.

मुंबई महापालिका निवडणूक: उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार का.? एकनाथ शिंदेंच्या उत्तरामुळे राजकीय चर्चांना उधाण.!!!

0

मुंबई महापालिका निवडणूक: उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार का.? एकनाथ शिंदेंच्या उत्तरामुळे राजकीय चर्चांना उधाण.!!!

 

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची निर्णायक लढाई ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. शिवसेनेत 2022 मध्ये झालेल्या मोठ्या फाटाफुटीनंतर ठाकरे गटासमोर आव्हानांची मालिका उभी राहिली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरेंसमोरील संकटं

एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर:

उद्धव ठाकरे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागलं

“खरी शिवसेना कोणाची?” हा प्रश्न न्यायालयात गेला

पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडला

तरीही, फाटाफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकत ताकद दाखवली, तर शिंदे गटालाही 7 जागांवर यश मिळालं. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. केवळ 20 आमदारांवर समाधान मानावं लागलं, तर महायुती मोठ्या बहुमतासह सत्तेत आली.

मुंबई महापालिका: प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न

मुंबई महापालिका ही अनेक दशकांपासून शिवसेनेची बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे:

ठाकरे गटासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई ठरते आहे

पराभव झाल्यास उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपेल का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत

याच पार्श्वभूमीवर ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंना थेट सवाल विचारण्यात आला.

“मी कोणाला संपवण्याची भाषा करणार नाही” – एकनाथ शिंदे

या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले,

> “मी एवढा मोठा नाही की कोणाचं राजकारण संपवण्याची भाषा करेन. पण जर तुम्ही लोकांचं काम केलं नाही, तर लोक आपोआप दूर जातात.”

लोक उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटाकडे का येत आहेत, याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले,

> “आज उबाठा सोडून लोक माझ्याकडे का येत आहेत? सगळे लोक वाईट आहेत का? सगळाच कचरा आहे का? लोकांना पाठिशी उभा राहणारा नेता आणि संकटात धावून जाणारा कार्यकर्ता लागतो. तो त्यांनी माझ्यामध्ये पाहिलाय.”

यावेळी त्यांनी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही दिला.

“राजकारणात कोणताही पक्ष कायमचा संपत नाही”

उद्धव ठाकरे पराभूत झाले तर त्यांचं राजकारण संपेल का, या चर्चांवर शिंदे म्हणाले,

> “राजकारणात कोणताही पक्ष कायमचा संपत नसतो. चढ-उतार येत असतात.”

यासाठी त्यांनी काँग्रेसचं उदाहरण देत सांगितलं की,

काँग्रेसच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले

त्यामुळे जनतेनं सत्ताबदलाचा निर्णय घेतला

त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गेल्या 10–11 वर्षांत विकासकामांवर भर दिला

महाराष्ट्रातही लोक काम पाहून निर्णय घेतात, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.

राजकीय अर्थ

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे दोन गोष्टी स्पष्ट होतात:

1. ते थेट उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपेल असं म्हणत नाहीत

2. मात्र, लोकांचा कौल हा कामगिरीवरच अवलंबून असल्याचा ठाम संदेश देतात

मुंबई महापालिकेची निवडणूक त्यामुळे:

उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची परीक्षा

तर एकनाथ शिंदेंसाठी आपली पकड अधिक मजबूत करण्याची संधी अशी ठरणार असल्याचं चित्र आहे.

आगामी काळात मुंबई महापालिकेचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.

गोंडगाव विदयालयात स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.!!!

0

गोंडगाव विदयालयात स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विदयालयात दि. ७ रोजी दुपारी १२.३० वाजता स्वातंञ्य सेनानी, शिक्षण महर्षी नानासाहेब स्वर्गीय यशवंतराव नारायणराव चव्हाण यांची १०३ वी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. सुरुवातीस स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो,बी. जी. ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांनी स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

लाडकी बहीण योजना लाभाऐवजी त्रासाचीच हमी.?

0

लाडकी बहीण योजना  लाभाऐवजी त्रासाचीच हमी.?

 

महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज अनेक महिलांसाठी दिलास्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. योजना जाहीर करताना गाजावाजा, जाहिरातबाजी आणि राजकीय श्रेयवाद भरपूर झाला; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी प्रशासनाची असंवेदनशीलता आणि तांत्रिक अपयश उघडकीस आले आहे.

केवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली, पण ही मुदत वास्तवाशी फारकत घेणारी ठरली. संकेतस्थळ वारंवार बंद पडणे, ओटीपी न मिळणे, माहिती अपलोड न होणे यामुळे हजारो महिलांना केवायसी करता आली नाही. ग्रामीण भागातील महिलांना तर इंटरनेट, स्मार्टफोन आणि तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे दुहेरी अडचणींचा सामना करावा लागला.

याहून गंभीर बाब म्हणजे, तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली आणि त्याची शिक्षा त्यांनाच भोगावी लागत आहे. पात्र असूनही लाभ नाकारणे ही प्रशासकीय बेफिकिरी नाही तर अन्यायच म्हणावा लागेल. महिला व बालविकास कार्यालये आणि सेतू केंद्रे महिलांच्या गर्दीने ओसंडून वाहत असून, “ऑनलाईन करा” या एकाच उत्तराने प्रशासन जबाबदारी झटकत आहे.

सरकारने योजना आखताना जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास केला होता का, हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ डिजिटल प्रणालीवर अवलंबून राहून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, ही अपेक्षाच चुकीची ठरत आहे. योजना लाभार्थी केंद्रित असायला हव्यात, की प्रशासन-सुविधाजनक, हा मूलभूत प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश नक्कीच चांगला आहे; मात्र अंमलबजावणीतील गोंधळामुळे तो फोल ठरत आहे. सरकारने तातडीने केवायसीची मुदत वाढवावी, ऑफलाइन पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि तांत्रिक दोषांसाठी जबाबदार यंत्रणांवर कारवाई करावी. अन्यथा, महिलांच्या नावाने सुरू केलेली ही योजना त्यांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरेल.

घोषणांनी योजना यशस्वी होत नसतात; त्या यशस्वी होतात प्रभावी अंमलबजावणीने. लाडकी बहीण योजना ही केवळ राजकीय घोषणा न राहता खऱ्या अर्थाने महिलांसाठी लाभदायक ठरावी, हीच अपेक्षा.

कासोदा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.!!!

0

कासोदा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.!!!

कासोदा ता. एरंडोल  प्रतिनिधी

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार समाजाच्या दैनंदिन कार्यात मोलाचे योगदान असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेत पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील प्रश्न, अन्याय व प्रशासनाच्या कार्यावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व पत्रकारितेच्या माध्यमातून कसे अधोरेखित होते, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांनी सत्य, निष्ठा व सामाजिक बांधिलकी जपून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना स. पो. नि. श्रीकांत पाटील यांनी पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समाजात शांतता, सुव्यवस्था व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमास नरेंद्र पाटील, नुरुद्दीन मुल्लाजी, केदारनाथ सोमानी, जितेंद्र ठाकरे, शैलेश पांडे, सुरेश ठाकरे, सागर शेलार, प्रशांत सोनार, घनश्याम पांडे, अॅड. वासुदेव वारे, अहमद रजा खान आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला.

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भडगाव तालुका यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना ‘गिरणा नवरत्न पुरस्कार’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासह परिसरातील पर्यावरण, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या समारंभाला भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार अनिल भामरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राजेंद्र निकम यांच्यासह भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांचे पती प्रदीप (जहांगीर) मालचे तसेच नगरसेवक विजयकुमार भोसले, अतुलसिंह परदेशी, सचिन चोरडिया,अलीम शहा (छोटे सरकार), इम्रानअली सय्यद, शशीकांत येवले, साप्ताहिक महाराष्ट्र चौफेर चे मुख्यसंपादक अबरार मिर्झा, निलेश मालपुरे, मा नगरसेविका तथा फ्रुट सेल  सोसायटी चे संचालिका योजना ताई, फ्रुट सेल  सोसायटी चे संचालक प्रभाकर शामराव पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सकारात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माउली फाउंडेशनच्या वतीने संगिता जाधव, उद्योजक दिलीप शेंडे, धैर्य कॉम्प्युटेकचे संचालक महेंद्र अहिरराव, अंबिका कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय पाटील, इंदुमती ट्रेडर्सचे संचालक नाना चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.

कार्यक्रमास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, तालुका सचिव यशकुमार पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

0

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

 

अबरार मिर्झा

_महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पत्रकारांचा सन्मान करण्याचा सोहळा नसून, समाजातील पत्रकारितेच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि निर्भीड पत्रकारितेच्या परंपरेचा पुनरुच्चार करतो.

इ.स. १८३२ साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजप्रबोधनाची मशाल पेटवली. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात सत्य मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे धाडसाचे काम होते. मात्र जांभेकरांनी ज्ञान, विज्ञान, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहित या विषयांना प्राधान्य देत पत्रकारितेला दिशा दिली. त्यांनी पत्रकारितेला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाजशिक्षणाचे प्रभावी साधन बनवले.

आजच्या काळात पत्रकारितेची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. छापील माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी माहितीचे स्वरूप बदलले आहे. माहिती क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचते; मात्र त्याचबरोबर अफवा, अर्धसत्य आणि सनसनाटीपणाचे आव्हानही वाढले आहे. अशा परिस्थितीत पत्रकाराची जबाबदारी अधिक कठीण आणि अधिक महत्त्वाची बनली आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करतो. सामान्य नागरिकांचे प्रश्न, दुर्लक्षित घटकांचे दुःख, भ्रष्टाचार, अन्याय या सर्व बाबी समाजासमोर निर्भीडपणे मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य पार पाडताना सत्यनिष्ठा, निष्पक्षता आणि सामाजिक भान जपणे अत्यावश्यक आहे.

आज व्यावसायिक स्पर्धा, टीआरपी, लाईक्स-व्ह्यूज यांच्या दबावाखाली पत्रकारितेची नैतिकता धोक्यात येत असल्याची टीका होत आहे. अशा वेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांकडे पाहणे गरजेचे ठरते. त्यांनी पत्रकारितेला मूल्यांची बैठक दिली होती. त्या मूल्यांची जपणूक करणे ही आजच्या पत्रकारांसमोरील खरी कसोटी आहे.

पत्रकार दिन हा केवळ अभिनंदनाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय योगदान देत आहोत? आपली लेखणी सत्याच्या बाजूने आहे का? दुर्बलांच्या आवाजाला आपण व्यासपीठ देतो आहोत का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा दिवस आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेत, बदलत्या काळाशी जुळवून घेत सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पत्रकारितेचा दीपस्तंभ उजळवत ठेवण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक पत्रकारावर आहे._

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

0

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ. सुनीता किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार हाजी अबुलेस आलाउद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील मुस्लिम नगरसेवक, समाजसेवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, सलोखा व विकासाभिमुख प्रशासन या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व पायाभूत विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सौ. पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

शब्दांची जबाबदारी आणि काळाची हाक

0

शब्दांची जबाबदारी आणि काळाची हाक

 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केवळ साहित्यिक मंच व्यापला नाही, तर समकालीन समाजमनालाही अंतर्मुख होण्यासाठी एक प्रबोधनात्मक, जबाबदार आणि मूल्यकेंद्री आव्हान दिले. सुप्रसिद्ध कादंबरीकार व ऐतिहासिक कथालेखक म्हणून मराठी वाङ्मयात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांची निवड केवळ साहित्यिक कर्तृत्वासाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक जाणिवा असलेला विचारवंत म्हणून झाली होती, हे त्यांच्या भाषणातील आशयातून प्रकर्षाने जाणवते. त्यांनी शब्द हे केवळ सौंदर्यनिर्मितीचे साधन नसून समाजपरिवर्तनाची नैतिक जबाबदारी वाहणारे प्रभावी अस्त्र आहे, ही भूमिका ठामपणे मांडली. साहित्य हे काळाचे केवळ प्रतिबिंब न राहता दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे असावे, असा सूचक विचार त्यांच्या भाषणातून सातत्याने व्यक्त होत राहिला. मराठी साहित्याची परंपरा ही केवळ गौरवगाथांची मालिका नसून संघर्ष, प्रश्न, परिवर्तन आणि सत्यशोधनाची अखंड प्रक्रिया आहे, हे सांगताना त्यांनी संतपरंपरा, शाहिरी वाङ्मय, समाजसुधारक, दलित साहित्यिक आणि आधुनिक विचारवंतांची वैचारिक साखळी उलगडली. भाषणात भावनांचा आवेश होता; मात्र त्याहून अधिक बौद्धिक शिस्त, वैचारिक प्रामाणिकता आणि सामाजिक भान प्रकर्षाने जाणवत होते. वेगवान, तंत्रज्ञानप्रधान काळात साहित्याची उपयुक्तता काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले की माणूस जेव्हा माणूसपण हरवू लागतो, तेव्हा साहित्यच त्याला स्वतःकडे पाहण्याचा आरसा दाखवते. त्यामुळे साहित्यसंमेलन हे केवळ उत्सव नसून सामूहिक आत्मपरीक्षणाची जिवंत प्रक्रिया आहे, ही जाणीव त्यांच्या भाषणातून ठळकपणे अधोरेखित झाली.

 

मराठी भाषेची सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जबाबदारी हा ९९व्या संमेलनातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला. संमेलनाध्यक्षांनी स्पष्ट केले की भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून समाजाची सामूहिक स्मृती, मूल्यव्यवस्था आणि अस्मिता जपणारी सजीव शक्ती आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात भाषा उपयुक्ततेच्या निकषांवर मोजली जात असताना, मराठीने आपल्या मुळाशी असलेली नाळ तोडू नये, असा सजग इशारा त्यांनी दिला. भाषा आणि संस्कृती यांचे नाते नदीसारखे असल्याचे प्रतिमात्मक वर्णन करत त्यांनी सूचित केले की नदी वाहते, बदलते, नवे प्रवाह स्वीकारते; मात्र उगम विसरल्यास ती कोरडी पडते. या विचारातून परंपरेचे भान राखत आधुनिकतेचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित होते. मराठी साहित्याने लोकभाषा, बोली, ग्रामीण व आदिवासी संवेदना आत्मसात करत लोकजीवनाशी नाते टिकवले आहे, याची त्यांनी विशेष दखल घेतली. भाषेतील शुद्धता केवळ व्याकरणिक काटेकोरपणात नसून आशयाच्या प्रामाणिकतेत असते, हा सूक्ष्म पण मूलभूत विचार त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने पुढे आला. विद्यार्थ्यांनी भाषा केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न ठेवता विचारांची शिस्त, सांस्कृतिक जाणीव आणि संवेदनशीलता विकसित करणारे माध्यम म्हणून आत्मसात करावी, असा सूचक संदेश या भाषणातून सातत्याने उमटत राहिला.

 

अध्यक्षीय भाषणाचा वैचारिक गाभा म्हणजे साहित्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा अटळ व अविभाज्य संबंध होय. तटस्थतेच्या नावाखाली मौन धरणे हेही एक प्रकारचे सामाजिक अपराधीपण आहे, असा सूचक पण ठाम विचार त्यांनी मांडला. भाषा, जात, वर्ग, लिंग, आर्थिक विषमता, स्थलांतर, ग्रामीण व आदिवासी जीवनातील प्रश्न, पाणीटंचाई, आरोग्यसेवांची दरी, शिक्षणातील असमानता, पर्यावरणीय संकटे आणि बदलते श्रमसंबंध यांसारख्या समकालीन वास्तव प्रश्नांपासून साहित्याने पळ काढू नये; उलट, या प्रश्नांना शब्द देणे हेच साहित्याचे खरे कर्तव्य आहे, हा विचार त्यांच्या भाषणाचा वैचारिक कणा ठरला. दलित-बहुजन साहित्याने संविधानिक मूल्यांच्या आधारावर उभे केलेले संघर्षपर साहित्य समाजपरिवर्तनाची दिशा दाखवणारे ठरले आहे, याची त्यांनी ठळक नोंद घेतली. इतिहासातील अनेक साहित्यिक उदाहरणांचा संदर्भ देत त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले की जेव्हा साहित्याने खोल प्रश्न विचारले, तेव्हाच समाजाने स्वतःकडे पाहण्याचे धैर्य केले. संवेदनाविरहित प्रबोधन कोरडे ठरते आणि विचारांशिवायची भावना दिशाहीन होते; म्हणून साहित्यिकाने भावना आणि विवेक यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे, हा संदेश त्यांच्या भाषणातून ठामपणे व्यक्त झाला.

 

शिक्षणव्यवस्था आणि साहित्य यांचे नाते हा संमेलनातील आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणून पुढे आला. साहित्य हे केवळ अभ्यासक्रमातील घटक न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचे प्रभावी साधन आहे, हे संमेलनाध्यक्षांनी ठामपणे मांडले. आजच्या परीक्षाभिमुख शिक्षणपद्धतीत संवेदनशीलता, मूल्यनिष्ठा, स्त्री-पुरुष समता, सामाजिक न्याय, पर्यावरणीय जाणीव आणि चिकित्सक विचार यांना दुय्यम स्थान मिळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. साहित्य विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवते, सहानुभूती विकसित करते, वंचित घटकांचे अनुभव समजून घेण्याची दृष्टी देते आणि मतभिन्नतेचा सन्मान करायला शिकवते, हा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केला. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे न राहता साहित्याच्या माध्यमातून संवाद घडवणारे, विचारप्रवर्तक मार्गदर्शक व्हावे, असे सूचक आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीला केवळ माहिती नव्हे, तर मूल्यांची दिशा देणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे, ही जाणीव या विचारातून ठळकपणे पुढे आली.

 

तंत्रज्ञान आणि साहित्याच्या भविष्यासंदर्भातील विचारही त्यांच्या भाषणाचा एक ठळक आणि समकालीन भाग ठरला. डिजिटल माध्यमांनी वाचनाच्या सवयी बदलल्या असल्या तरी वाचनाची गरज संपलेली नसून ती अधिक तीव्र झाली आहे, असा स्पष्ट दृष्टिकोन त्यांनी मांडला. ब्लॉग, पॉडकास्ट, ई-पुस्तके, ग्राफिक नॅरेटिव्ह यांसारख्या नव्या साहित्यप्रकारांकडे धोका म्हणून नव्हे, तर नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी म्हणून पाहावे, असा सूचक विचार त्यांच्या भाषणातून पुढे आला. विशेषतः सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव, तात्काळ प्रतिसाद देण्याची मानसिक सक्ती, तुलना आणि दृश्य-लोकप्रियतेची स्पर्धा या डिजिटल संघर्षांमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला सखोल वाचनाची शांत जागा साहित्यच देऊ शकते, हे त्यांच्या विचारातून स्पष्ट झाले. तंत्रज्ञान हे शत्रू नसून साधन आहे; मात्र त्या साधनाचा वापर कोणत्या मूल्यदृष्टीने केला जातो, हे अधिक महत्त्वाचे आहे, असा ठाम आग्रह त्यांनी धरला. झटपट लोकप्रियता आणि अल्गोरिदमप्रधान वाचनसंस्कृतीच्या काळात दीर्घकालीन साहित्यिक मूल्यांची जपणूक करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाषांतर साहित्याच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक संवादात सहभागी होऊ शकते, हा दूरदृष्टीपूर्ण विचारही त्यांनी मांडला.

 

साहित्यिकांची भूमिका, संस्थात्मक जबाबदाऱ्या आणि आत्मपरीक्षण यांवरही संमेलनाध्यक्षांनी विशेष भर दिला. लेखक हा समाजाचा संवेदनशील घटक असून पुरस्कार, प्रसिद्धी आणि व्यासपीठांपेक्षा लेखनाची प्रामाणिकता अधिक महत्त्वाची आहे, हा विचार त्यांनी निर्भीडपणे मांडला. साहित्यिक संस्था, संमेलने, प्रकाशक आणि नियतकालिकांनी नवोदित लेखकांना व्यासपीठ, मार्गदर्शन, वैचारिक सुरक्षितता आणि चिकित्सक संवादाची संधी द्यावी, असे त्यांनी सुचवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि आत्मसंयम यांचा समतोल राखणे ही साहित्यिकांची नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. वाचकांशी प्रामाणिक संवाद साधणे आणि सतत आत्मपरीक्षण करणे हीच साहित्यिकाची खरी कसोटी आहे, हा संदेश त्यांच्या भाषणाचा नैतिक कणा ठरला.

 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप आशा, जबाबदारी आणि भविष्यदृष्टीच्या प्रकाशाने उजळलेला होता. सामाजिक असमानता, पर्यावरणीय संकटे, सांस्कृतिक ताणतणाव आणि बदलते जीवनप्रवाह असूनही साहित्याची भूमिका संपलेली नाही; उलट ती अधिक जबाबदार, व्यापक आणि मानवी झाली आहे, असा ठाम विश्वास संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. साहित्य माणसाला माणूस बनवते, त्याला प्रश्न विचारायला, स्वप्ने पाहायला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहायला शिकवते, हा विचार या संपूर्ण भाषणाचा सारांश ठरतो. साध्या वाचकापासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनाला समृद्ध करणारी ही दृष्टी काळाच्या पलीकडे जाणारी असली, तरी वर्तमानाशी घट्ट नाते सांगणारी आहे. म्हणूनच हे अध्यक्षीय भाषण आणि त्यातून साकारलेला विचार मराठी साहित्याच्या वाटचालीतील एक दिशादर्शक, प्रेरणादायी आणि मूल्यकेंद्री क्षण ठरतो.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : ०५/०१/२०२५

भडगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातील २ डंपर फरार की,तहसीलदारांच्या आशीर्वादाने सोडले ? कायद्याला हरताळ.

0

भडगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातील २ डंपर फरार की,तहसीलदारांच्या आशीर्वादाने सोडले ? कायद्याला हरताळ.

कायद्याचे नियम धाब्यावर; जिल्हाधिकारीही न्यायालयात “आवश्यक पक्षकार” होण्याची शक्यता

 

भडगांव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणात गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आय.पी.सी कलम ३५३, ३७९,महसूल अधिनियम, MMDR Act तसेच सार्वजनिक शांतता भंगास कारणीभूत गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल होऊन कारवाई सुरू असतानाच जप्त करण्यात आलेले २ डंपर दंड भरून किंवा दंडन न भरता प्रशासकीय स्तरावर सोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महसुल प्रशासनाने भडगांव पोलिसात गुन्हा दाखल केल्या नंतर मुद्देमाल पोलिसाच्या ताब्यात न दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे,संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी अद्याप फरार असून तपास सुरू असताना आणि न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता ही कारवाई झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कायदा तज्ज्ञांच्या मते, वरील गुन्हे non-compoundable स्वरूपाचे असून अशा प्रकरणात वाहन सोडण्याचा अधिकार केवळ सक्षम न्यायालयालाच आहे. मात्र,या प्रकरणात न्यायालयीन आदेशा शिवाय डंपर सोडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तक्रारीनुसार, कारवाई दरम्यान महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांशी आरोपी व त्याच्या समर्थकांनी वाद, हुज्जत घातली. त्यामुळे तणावपूर्ण आणि दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. तरीही जप्त वाहन सोडण्यात आल्याने अवैध वाळू माफियांना थेट बळ मिळाल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणी ACB जळगाव/नाशिक विभागाकडे IPC कलम 166, 217, 218 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 व 13 अंतर्गत कडक तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि आरोपींना लाभ पोहोचवल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात JMFC न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल होणार असून, तहसीलदारांसह जिल्हाधिकारी यांनाही न्यायालयात “आवश्यक पक्षकार” करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयांची न्यायालयीन छाननी अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

अवैध वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का?”, “कायदा-सुव्यवस्था धोक्यात घालणाऱ्या निर्णयांची जबाबदारी कोणाची?” असे प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ACB चौकशी आणि न्यायालयीन कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!