ब्रेकिंग :
  • आई-वडिलांचे प्रेम : प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करणारी अमूल्य शक्ती.!!!
  • भडगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी घोषित पत्रकार दिन नियोजनाबाबत सविस्तर चर्चा.!!!
  • घरातून देहव्यापार चालवणारा आरोपी ताब्यात; कल्याणी वर्मा यांच्या पथकाची यशस्वी कारवाई
  • गुन्हेगारीवर तांत्रिक लगाम चाळीसगाव पोलिसांनी ११ गहाळ मोबाईल शोधले.!!!
  • RBI कडून सेव्हिंग अकाऊंट्सवर मोठा निर्णय : झिरो बॅलन्स खाते, मोफत डिजिटल व्यवहार आणि बँकिंग चार्जेसमध्ये मोठे बदल
प्रति तास 90 किमी वेगाने सरकणारे ‘दितवाह’ चक्रीवादळ; तामिळनाडू–पुद्दुचेरीला रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home मान्सून

प्रति तास 90 किमी वेगाने सरकणारे ‘दितवाह’ चक्रीवादळ; तामिळनाडू–पुद्दुचेरीला रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
November 29, 2025
in मान्सून, राष्ट्रीय, विशेष
0 0
प्रति तास 90 किमी वेगाने सरकणारे ‘दितवाह’ चक्रीवादळ; तामिळनाडू–पुद्दुचेरीला रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे.!!!
0
SHARES
305
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दितवाह’ चक्रीवादळाने श्रीलंकेत भीषण हाहाकार माजविल्यानंतर आता भारतीय किनाऱ्याकडे वेगाने सरकण्यास सुरुवात केली आहे. श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे व्यापक नुकसान झाले असून, आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू, तर 130 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पूर, भूस्खलन आणि वाऱ्याच्या तुफानी गस्तींमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, हे चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीकडे सरकत असून पुढील 48 तास भारतीय उपखंडासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ शनिवारी मध्यरात्री तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून 60–70 किमी अंतरावर येण्याची शक्यता आहे. तर रविवारी सकाळपर्यंत ते पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर प्रभाव टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वादळाचा वेग 90 किमी/तासापर्यंत जाण्याची शक्यता

हवामान विभागानुसार, दितवाहची तीव्रता महासागरात कायम राहण्याची शक्यता असून—

तामिळनाडू व पुद्दुचेरीच्या किनारी भागांत वाऱ्याचा वेग 70–80 किमी/तास.काही ठिकाणी 90 किमी/तास पर्यंत

आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत 50–60 किमी/तास

पर्यंत वाढू शकतो. समुद्रात 8 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशला रेड अलर्ट

चक्रीवादळाच्या संभाव्य तडाख्याच्या पार्श्वभूमीवर IMD ने तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि काही आंध्र प्रदेशातील भागांना रेड अलर्ट जारी केला आहे. या तीनही राज्यांना अतिमुसळधार पावसाचा, वाऱ्याच्या तुफानी गस्तींचा आणि पुराचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तेलंगणालाही या वादळाचा अप्रत्यक्ष फटका बसू शकतो, असेही IMD ने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने अनेक किनारी जिल्ह्यांत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, बचाव पथके, NDRF आणि SDRF तैनात करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती

दितवाहचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला तरी काही वातावरणीय बदलांचे संकेत IMD ने दिले आहेत. कोकणात ढगाळ वातावरण, अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. थंडी काही प्रमाणात कमी-जास्त होण्याचीही शक्यता आहे. नागरिकांना हवामान खात्याच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चक्रीवादळाच्या नजरेत पुढील 48 तास

तज्ञांच्या मते पुढील दोन दिवस या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल. तटीय राज्ये आणि त्यांतील जिल्ह्यांना या काळात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उंच भरतीला सामोरे जावे लागू शकते. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाने गतीने सुरू केले आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!