महाराष्ट्रराजकीय

टांगे आगे बढाने के लिए होती है. ” सुषमा अंधारे यांची चित्रा वाघ यांच्यावर खालच्या भाषेत टीका टीका

टांगे आगे बढाने के लिए होती है. ” सुषमा अंधारे यांची चित्रा वाघ यांच्यावर खालच्या भाषेत टीका टीका

मुंबई:-

दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात बोलताना आमदार चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाल्याचे आपण पाहिले, यावेळी चित्रा वाघ  यांनी, परब यांना, मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असे वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावर आता सुषमा अंधारे  यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 

काय म्हणाल्या सुषमा अंधारे.?

“टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के काम मे अडाने के लिए नही होती” असं सुषमा अंधारे चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलल्या आहेत. “त्या बाईचा मेंदूच तेवढा आहे. शील, चारित्र्य, इमान हे शब्द उच्चारण्याची ज्यांची लायकी नाही. त्यांची लायकी संबंध महाराष्ट्राने ठरवून टाकली आहे” अशा शब्दात चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

कुणाल कामरा प्रकरणावर काय म्हणाल्या.?

“कुणाल कामराचा स्टुडिओ तोडण्याचा अधिकार कोणाला आहे?. तुम्ही स्टुडिओ तोडताय तुम्ही सरकार पक्षात आहात याचा विसर पडलाय का?” असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय. “गद्दार ही टर्म लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून आपण धर्मवीर चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले. त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका कवितेने पाणी फिरलं.

 

कुणाल कामराचा विषय भाजपने ठरवून मोठा केला. शिंदे साहेब याचा विचार करा” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “ज्या सभागृहात एका सेकंदाला 6400 खर्च होतो, त्या सभागृहात महाराष्ट्राच्या हिताच्या काय चर्चा झाल्या?. फडणवीस यांनी सभागृहाचा सन्मान करायला त्यांच्या सदस्यांना शिकवावं. एक सदस्य थिल्लरपणा दाखवतात त्याच्यावर तुम्ही चकार शब्द बोलणार नाही” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

 

‘वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर काय म्हणाल्या.?’

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर चर्चा करून जाणीवपूर्वक लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका सुषमा अंधारे  यांनी केली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!