Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 108

भडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा.!!!

0

भडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

 

भडगाव शहरातील क्रांती सूर्य महात्मा फुले चौकात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जयंती साजरा करण्यात आली. यावेळी माळी पंच मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय संस्था व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी सावित्रीमाई फुले यांनी अनमोल दिलेलं योगदान आहे. त्यांच्या त्याग व कर्तृत्वाला वंदन करत आज महात्मा फुले चौकात सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जय ज्योती जय क्रांती च्या घोषणां देण्यात आल्या. यावेळी अर्जुन महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, भिकन महाजन, विजय महाजन, साहेबराव महाजन, मुकुंदा महाजन, पत्रकार सागर महाजन, पत्रकार नितीन महाजन, पत्रकार चेतन महाजन, पत्रकार शुभम सुराणा, रवींद्र अहिरे, विनोद महाजन, पिंटू महाजन,गोकुळ महाजन, बबलू महाजन, रितेश महाजन, शुभम महाजन, मयूर महाजन, रमेश महाजन, गोविंद महाजन, आप्पा महाजन, आनंदा महाजन, नाना महाजन, रवींद्र महाजन, प्रदीप महाजन, दिनेश पाटील, विजय महाजन, प्रविण महाजन सर, आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

१० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्त  ठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन.!!!

0

१० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्त 

ठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन.!!!

 

नाशिक रोड प्रतिनिधी :- 

येत्या १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रात तसेच भारतात जेथे जेथे सर्व शाखीय सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे तेथे स्थानिक सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सुवर्ण नियंत्रण कायदा आणि सर्व शाखीय सोनार समाजावर झालेले व्यावसायिक परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित करावे, असे आवाहन

सकल भारतीय सोनार समाज संघटन

चे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.

चर्चासत्रात सुवर्ण नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर सोनार व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, सोनार सराफ आणि सुवर्ण कारागिरी करणाऱ्या सोनार समाज घटकांवर झालेले परिणाम यावर भर देण्यात यावा, असे आवाहन देखील मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.

६जानेवारी पत्रकार दिन,जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन.!!!

0

६जानेवारी पत्रकार दिन,जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन.!!!

 

लोकमत संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी :-

पत्रकार दिन निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले असून यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघांचे इलेक्ट्रिनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी यांनी केले आहे.

 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत संपादक संजय आवटे असणार आहेत तर दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन,पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणारं असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजुमामा भोळे, आ. किशोरअप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांतधिकारी विनय गोसावी,लोकमत जळगाव आवृत्ती संपादक, किरण अग्रवाल,पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, श्री राष्ट्रीय करणीसेनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील,सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव,मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक जेष्ठ पत्रकार कमलाकर वाणी,जेष्ठ पत्रकार विजय पाठक,दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील,पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित राहतील.

 

जिल्ह्यातील १० जणांना दर्पणकार पुरस्कार

 

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार जाहीर आले आहेत. यात –

 

प्रिंट मीडिया :

•चंद्रशेखर जोशी (तरुणभारत)

•सुनील पाटील (लोकमत),

•सुधाकर जाधव (दिव्यमराठी)

•चेतन साखरे (देशदूत)

 

इलेक्ट्रॉनिक मीडिया :

•किशोर पाटील (किशोर पाटील)

•संजय महाजन (साम TV )

•विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत),

 

डिजिटल मीडिया :

नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल)

निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)

 

छायाचित्रकार – सचिन पाटील, लोकमत 

तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी,नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी,

जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,ग्रामीण जिल्हाध्यक्ष,

नागराज पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष,

संतोष नवले,खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने,खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे,पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे,

डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, महानगराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले आहे.

कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

0

कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

भडगाव शेतकरी संघटनेचे मुख्यमंञ्यांसह तहसिलदारांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कापसाला १० हजार रुपये भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करावा. खरीप हंगाम सन २०२३ चा पिक विमा लाभ मिळावा. शेतकर्यांची मुले चुकीच्या मार्गाला लागुन दारु, सट्टा, मटका, जुगार यांच्या आहारी गेल्याने अवैध धंदे तात्काळ बंद करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आदि मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका पदाधिकारी, महाराष्टृ जागृत जनमंचचे भडगाव तालुका पदाधिकारी, उत्तर महाराष्टृ जलपरीषद भडगाव तालुका पदाधिकारी व शेतकरी अशा तिन्ही संघटनांमार्फत राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी पाचोरा भुषण अहिरे, भडगाव तहसिलदार शितल सोलाट आदिंना देण्यात आलेले आहे.

भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, राज्यात शंभर टक्के दयनीय परीस्थिती आहे. शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी दयावी. वरील सर्व मागण्या करण्यास व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच कापसाला १० हजारांचा भाव दयावा. शेतकर्यांनी बॅंकेंकडुन कर्ज घेतलेले आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बॅंकेचा थकबाकीदार झाला आहे. सरकारने गेल्या १० वर्षापासुन शेतमालाला योग्य भाव दिला नाही. म्हणुन शेतकरी थकबाकीदार झाला आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप ,काही वेळा कोरडा दुष्काळ, काही वेळा ओला दुष्काळ अशी परीस्थितीतुन बाहेर निघणे कठीण आहे. तरी बॅंकांनी शेतकर्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. त्याकरीता सरकारने कर्ज माफी त्वरीत करावी. आमच्या शेतकर्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, शेतकरी हितासाठी प्रयत्न करावा. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर, तालुका संपर्क प्रमुख भगवान नारायण चौधरी, तालुका उपाध्यक्ष तुकाराम तुळशिराम माळी, खजिनदार मनोज सुभाष परदेशी, कार्याध्यक्ष अनिल रामचंद्र पाटील, जेष्ट मार्गदर्शक शांताराम वना आचारी, सदस्य वाल्मिक जगन्नाथ वाघ, लक्ष्मण पाटील, महासचीव सुभाष दयाराम ठाकरे, अल्काबाई खैरनार आदि पदाधिकारी, शेतकर्यांच्या सहया आहेत.

 

गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि क. ज. वाघ रुजु. विदयालयामार्फत सत्कार.!!!

0

गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि क. ज. वाघ रुजु. विदयालयामार्फत सत्कार.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत कळमडु माध्यमिक विदयालयाचे पर्यवेक्षक क. ज. वाघ यांची संस्थेने गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. ते विदयालयात दि. १ रोजी रुजु झाले आहेत. यावेळी नवनिर्वाचीत मुख्याध्यापक क. ज. वाघ व सेवानिवृत्त मुख्याध्यापक ओ. पी. जाधव या दोघांचा गोंडगाव विदयालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुञसंचलन क्रिडा शिक्षक एस. डी. चौधरी यांनी केले. मुख्याध्यापक क. ज. वाघ यांची आतापर्यंत एकुण सेवा ३१ वर्ष झाली आहे. यापुर्वी त्यांनी पाटणा, तरवाडे, बहाळ, चाळीसगाव, गणेशपुर, हिरापुर, दहिवद, खेडगाव अशी सेवा बजावली आहे. या कार्यक्रमावेळी पी. व्हि. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस, आम्ले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी हजर होत्या.

 

लाडक्या बहिणी’च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

0

­लाडक्या बहिणी’च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

महाराष्ट्रात ‘माझी लाडकी बहिन योजने’ अंतर्गत 6 व्या हप्त्यानंतर, लाभार्थी आता नवीन वर्षात 7 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे.?

या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये येतात. आतापर्यंत सरकारने ९ हजार रुपयांचे ६ हप्ते जारी केले आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाभ घेण्यासाठी, महिलांना आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक सादर करावे लागतील.

 

मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात.?

 

“माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत, पात्र महिलांना मार्च महिन्यापासून त्यांच्या खात्यात 2100 रुपये मिळू शकतात. लाभार्थी महिलांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीने जनतेला दिले होते. हे आश्वासन सरकारसाठी फायदेशीर ठरले आणि महाराष्ट्रात महायुतीला दणदणीत विजय मिळाला, त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले.

 

योजनेचे उद्दिष्ट 

 

‘माझी लाडकी बहिन योजना’ ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी महिलांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाची चांगली काळजी घेता येईल आणि त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे, ही योजना महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

गोंडगाव विदयालयात निरोप समारंभ. मुख्याध्यापक ओ. पी. जाधव सेवानिवृत्त.!!!

0

गोंडगाव विदयालयात निरोप समारंभ. मुख्याध्यापक ओ. पी. जाधव सेवानिवृत्त.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक ओ. पी. जाधव हे आपल्या ३४ वर्ष ६ महिन्याच्या प्रदिर्घ सेवेतुन दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्त समारंभ विदयालयामार्फत दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे कलाशिक्षक पी. व्हि. जाधव हे होते. यावेळी व्यासपिठावर मुख्याध्यापक ओ. पी. जाधव, वर्षा ओमप्रकाश जाधव, माधुरी भुषण बोरसे, संगीता प्रमोद जाधव, पी. व्हि. जाधव, एस. जी. भोपे आदि मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने हजर होत्या. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक ओ. पी. जाधव यांचेसह सपत्नीक सत्कार करण्यात आला. व महादेवाचा फोटो, ड्रेस, टोपी, टाॅवेल, साडी विदयालयामार्फत देऊन सत्कार व निरोप देण्यात आला. ओ. पी. जाधव यांची सेवा देवळी, हिंगोणे, गोंडगाव, वाघळी, पातोंडा, दहिवद, कनाशी, गोंडगाव अशी झाली आहे. या कार्यक्रमाचे सुञसंचालन क्रीडा शिक्षक एस. डी. चौधरी यांनी केले. तर प्रास्तविक एस. आर पाटील यांनी केले. यावेळी कोमल पाटील, जानवी पाटील आदि विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर एस. एस. आम्ले, बी. डी. बोरसे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारार्थी ओ. पी. जाधव यांनी मनोगतातुन सांगीतले कि, विदयालयामार्फत माझ्या निरोप सत्कार समारंभाचा चांगला कार्यक्रम घडवुन आणला. यामुळे मी भारावलो आहे असे सांगीतले. तर अध्यक्षीय भाषण पी. व्हि. जाधव यांनी 

 केले. 

यावेळी सी. एस. सोन्नीस, पी. व्ही. जाधव, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस आर पाटील, पी. व्ही. सोळंखे, बी. डी. बोरसे, एस एस आम्ले, आर एस सैंदाणे, एस आर पाटील, एन ए मोरे, आर बी महाले, पी जे देशमुख, एस जी भोपे, ए एम परदेशी, एस एल मोरे, व्हि एम जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. उपस्थितांचे आभार एस आर महाजन यांनी मानले.

 

कानबाई मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.!!!

0

कानबाई मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.!!!

 

एरंडोल प्रतिनिधी :-

एरंडोल येथील कानबाई मित्र मंडळ यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मरीमाता मंदिरात कानबाई मातेच्या वह्या (भजन) गायन करून नवीन वर्षाचे स्वागत केले.

 

या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री भिका चौधरी आणि उपाध्यक्ष श्री आधार माळी यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ सदस्य श्री ओंकार चौधरी, श्री अशोक चौधरी, अजय महाजन, श्री चिंतामण चौधरी, ईश्वर मराठे, विक्रम पांचाळ, पंकज धनगर, भगवान बडगुजर, दिलीप बडगुजर, आत्माराम पाटील, प्रल्हाद मराठे, तुषार चौधरी आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

कार्यक्रमासाठी मरीमाता मंदिराचे पुजारी श्री यशवंत बुंदेले आणि मयुर बुंदेले यांचे सहकार्य लाभले.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी 2025 हे वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना कानबाई माता आणि मरीमातेच्या चरणी केली.

 

कानबाई मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात   सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

0

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात

  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

 

महाराष्ट्र डायरी न्युज करिता सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री.राहुल गावडे पाटील

 

सातारा : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजु व गरीब रुग्ण येत असतात. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत. याबाबतीत कोणत्याही तक्रारी येऊ देवू नका, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांनी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करावे, त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये, असे निर्देश देऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, रुग्णालय स्वच्छतेवरही भर द्यावा. रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय प्रतिपुर्ती प्रमाणीकरणासाठी येणारी देयके वेळेत प्रमाणित करुन द्यावी.

रुग्णालयात कामासाठी येणाऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका. त्‍यांची कामे तातडीने करा. समाजसेवक अधिक्षकांनी रुग्णांसाठी असणाऱ्या हक्कांची व सुविधांची माहिती देण्याबरोबर त्यांना स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर उपचार कसे मिळतील यासाठी काम करावेत. त्याचबरोबर रुग्णांना देण्यात येणारे जेवणाची तपासणी करुन जेवणात आणखीन रुग्णांना पोषक पदार्थ वाढवावेत, असे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा महत्त्वाची

0

शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा महत्त्वाची

 

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सकस आहार पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.

 

मंत्री भुसे  यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आहाराच्या गुणवत्तेसह सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिक्षणाच्या हक्क कायद्याअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 5 वी व 8 वीच्या परीक्षा, शिक्षक भरतीतील बदल, शाळांच्या पुनर्रचना, विशेष मुलांसाठी शिक्षकांच्या पदनिर्मिती, आणि आदर्श शाळांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले.

 

या बैठकीत शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गणवेश, पुस्तके, आहार, अपघात विमा, शैक्षणिक साहित्य, शुल्क प्रतिपूर्ती, ई-गव्हर्नन्स, ‘मुख्यमंत्री – माझी शाळा, सुंदर शाळा’, आणि शिष्यवृत्ती यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीस प्रधान सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त सुरज मांढरे, व इतर अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा पुरवण्यावर भर देत शासनाने शालेय व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

 

error: Content is protected !!