ब्रेकिंग :
  • वाडे विकासोमार्फत राजेंद्र परदेशी व अर्जुन पाटील यांचा सत्कार.
  • ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!!
  • ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान व सशक्ततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल.!!!
  • परदेशी, राजपुत समाजातील पाचोरा येथे वधु वर परीचय संमेलन.
  • पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या गावाच्या ४,९०७ खोट्या जन्म नोंदी,आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; एसआयटीमार्फत सखोल तपास सुरू
परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा” — संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी – महाराष्ट्र डायरी
  • Home 1
  • Home 2
  • About
  • Contact
Thursday, January 22, 2026
  • Login
महाराष्ट्र डायरी
  • Home 1
  • Home 2
  • About
  • Contact
No Result
View All Result
  • Home 1
  • Home 2
  • About
  • Contact
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा” — संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
November 28, 2025
in महाराष्ट्र, सामाजिक
0
0
परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा” — संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मैत्री संस्था, उत्प्रेरक फाउंडेशन, जनहित फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील बी. आय. टी. चाळ क्रमांक १ येथे भव्य, उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “संविधान जागर कवी संमेलनाने” झाली. या संमेलनात मोहन जाधव, निशाताई जाधव, डॉ. संतोष कांबळे, निखिल मोंडूला आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रभावी कविता सादर केल्या, तर अमर काझी यांनी पोवाड्याद्वारे श्रोत्यांची मनं जिंकली. कवी संमेलनानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रास सुरुवात झाली.

Related articles

वाडे विकासोमार्फत राजेंद्र परदेशी व अर्जुन पाटील यांचा सत्कार.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!!

प्रमुख अतिथी म्हणून शंकर लोखंडे (अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा समिती), मोहन जाधव (कवी, लेखक व बाबुराव जाधव यांचे चिरंजीव) आणि निशाताई जाधव (माता रमाई यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होते. तसेच अनिकेत मनोज संसारे (युवा नेते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) यांची विशेष उपस्थिती लाभली. कोषाध्यक्ष विजय पवार, सुमित संसारे व सहकारी; काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुशांत दोडमणी हे देखील उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष सुरज भोईर (अध्यक्ष : मैत्री संस्था) तर सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रभावीपणे पार पाडले.

कार्यक्रमात अनिकेत मनोज संसारे यांनी आपल्या थेट, जाज्वल्य आणि मनाला भिडणाऱ्या भाषणातून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, “ही वास्तू आमच्या समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. इथे बाबासाहेबांच्या अथक संघर्षाची बीजे रोवली गेली. फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीच्या स्मारकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. जिथे बाबासाहेब, रमाई व शाहू महाराज एका छताखाली आले— त्या ठिकाणी ‘राष्ट्रीय स्मारक’ दर्जा न मिळणे हा ऐतिहासिक अन्याय आहे. या वास्तूचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. मी आणि माझी संपूर्ण टीम या चळवळीस पूरक साथ देत, हजारो तरुणांना येथे आणून जागृती करण्याचे वचन देतो.”

यानंतर कार्यक्रमाची सांगता संविधान सरनामा अभिवाचनाने झाली. वाचनानंतर उपस्थितांनी बाबासाहेब ज्या घरात वास्तव्यास होते त्या पवित्र स्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले. “राष्ट्रीय स्मारक” दर्जा मिळवण्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा दृढ संकल्प व्यक्त करताना संपूर्ण वातावरण अधिकच प्रेरणादायी झाले. संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संतोष कांबळे, मुकुंद कांबळे, अ‍ॅड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, विकास कदम आणि डॉ. प्रभाकर कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. संविधान दिनाच्या या पवित्र दिवशी परळची ऐतिहासिक वास्तू नवचैतन्याने उजळून निघाली. “राष्ट्रीय स्मारक” दर्जासाठीची मागणी अधिक जोरकस, सुसंघटित आणि प्रभावी पद्धतीने पुढे येत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अखेरीस “जय भारत… जय संविधान…!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि संविधानप्रेमाचा उत्साह अधिक तेजस्वी झाला.

अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Posts

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!!

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!!

by अबरार मिर्झा
January 22, 2026
0

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!! कासोदा प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात हरविलेल्या तसेच अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत...

वाडे विकासोमार्फत राजेंद्र परदेशी व अर्जुन पाटील यांचा सत्कार.

वाडे विकासोमार्फत राजेंद्र परदेशी व अर्जुन पाटील यांचा सत्कार.

by अबरार मिर्झा
January 22, 2026
0

भडगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत दि. २२ रोजी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र लालचंद परदेशी यांचा तसेच...

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान व सशक्ततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल.!!!

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान व सशक्ततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल.!!!

by अबरार मिर्झा
January 22, 2026
0

अमळनेर प्रतिनिधी :- जितेंद्र वाघ केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात...

परदेशी, राजपुत समाजातील पाचोरा येथे वधु वर परीचय संमेलन.

परदेशी, राजपुत समाजातील पाचोरा येथे वधु वर परीचय संमेलन.

by अबरार मिर्झा
January 22, 2026
0

पाचोरा प्रतिनिधी:- परदेशी राजपुत समाजातील वधु वर परीचय संमेलनाचे आयोजन पाचोरा जि. जळगाव येथे दि. १ रोजी रविवारी सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे. हे संमेलन...

पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या गावाच्या ४,९०७ खोट्या जन्म नोंदी,आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; एसआयटीमार्फत सखोल तपास सुरू

पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या गावाच्या ४,९०७ खोट्या जन्म नोंदी,आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; एसआयटीमार्फत सखोल तपास सुरू

by अबरार मिर्झा
January 21, 2026
0

पारोळा प्रतिनिधी :- पारोळा तालुक्यातील रताळे गावालगत असलेल्या आणि सध्या पूर्णतः उजाड अवस्थेत असलेल्या भाटपुरा (भाटपुरी) गावाच्या नावाने तब्बल ३७ हजार बोगस जन्म दाखले तयार केल्याचा...

Next Post
भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ : निरीक्षक देवदत्त केकाण यांची ईव्हीएम तपासणी.!!!

भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ : निरीक्षक देवदत्त केकाण यांची ईव्हीएम तपासणी.!!!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरूच; ५०% आरक्षण ओलांडलेल्या ५७ ठिकाणांचे निकाल ‘अटीवर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरूच; ५०% आरक्षण ओलांडलेल्या ५७ ठिकाणांचे निकाल ‘अटीवर

The Important Things to Know Before Planning an International Yoga Retreat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Far far away, behind the word mountains, far from the countries Vokalia and Consonantia, there live the blind texts.

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • Home 1
  • Home 2
  • About
  • Contact
No Result
View All Result
  • Home 1
  • Home 2
  • About
  • Contact

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!