ब्रेकिंग :
  • आई-वडिलांचे प्रेम : प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करणारी अमूल्य शक्ती.!!!
  • भडगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी घोषित पत्रकार दिन नियोजनाबाबत सविस्तर चर्चा.!!!
  • घरातून देहव्यापार चालवणारा आरोपी ताब्यात; कल्याणी वर्मा यांच्या पथकाची यशस्वी कारवाई
  • गुन्हेगारीवर तांत्रिक लगाम चाळीसगाव पोलिसांनी ११ गहाळ मोबाईल शोधले.!!!
  • RBI कडून सेव्हिंग अकाऊंट्सवर मोठा निर्णय : झिरो बॅलन्स खाते, मोफत डिजिटल व्यवहार आणि बँकिंग चार्जेसमध्ये मोठे बदल
उजव्या कालव्यासह पाटचार्‍यांच्या स्वच्छता व दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home जळगाव

उजव्या कालव्यासह पाटचार्‍यांच्या स्वच्छता व दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी

पत्रकार अशोकबापू परदेशी यांनी पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
December 2, 2025
in जळगाव, सामाजिक
0 0
उजव्या कालव्यासह पाटचार्‍यांच्या स्वच्छता व दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

भडगाव प्रतिनिधी :—

वाडे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव परिसरात उजव्या कालव्याला या पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे तीन ठिकाणी भगदाड पडले असून कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार श्री. अशोकबापू परदेशी यांनी गिरणा पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन विभागाचे शाखा अभियंता श्री. सुभाष चव्हाण यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी गिरणा धरण १०० टक्के क्षमतेने भरले असून रब्बी हंगामासाठी भडगाव तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. रब्बी पिकांची पेरणी सुरू असताना उजव्या कालव्याला अजूनही पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी इच्छित नियोजन झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कालव्यातील गंभीर अडचणी

वाडे, बांबरुड प्र. ब आणि गोंडगाव भागात तीन ठिकाणी कालवा फुटून मोठी भगदाडे

कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला

कालव्यालगत काटेरी झुडपे, झाडे वाढून अस्वच्छता

मेन पाटचार्या आणि शेतात जाणाऱ्या पाटचार्या जमिनदोस्त व निकृष्ट अवस्थेत

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

कालव्यावरील सर्व भगदाडे तात्काळ बुजवणे व दुरुस्ती करणे

जेसीबी मशीनने कालवा व पाटचार्‍यांची स्वच्छता व खोदकाम

कालव्यातील गाळ काढून दोन्ही बाजूने माती टाकून कालवा मजबूत करणे

उजव्या कालव्याला लवकर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन

या कालव्याच्या पाण्याचा लाभ वाडे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नगरदेवळा स्टेशन, वडगाव, बाळद, भडगाव या गावांतील रब्बी, बागायत आणि फळबागायत पिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून पाणी सोडण्याची आतुरता व्यक्त केली जात आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!