आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न
भडगाव (जावेद शेख) –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुष्प द्वितीय दिन, रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आदर्श कन्या विद्या मंदिर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचा विषय महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित होता. विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांवर प्रभावी मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन युवराज आबा सुर्यवंशी (उपाध्यक्ष, माऊली फाउंडेशन) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी धम्मपाल सुरवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून भडगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेत सुमनताई गिरीधर पाटील विद्यालय, काकासाहेब पूर्णपत्रे विद्यालय चाळीसगाव, लाडकुबाई माध्यमिक विद्यालय, एम.एम. कॉलेज पाचोरा, शिंदे इंटरनॅशनल पाचोरा, जामनेर विद्यालय तसेच आदर्श कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे परीक्षण सौ.उज्वला देवकर व महेंद्रकुमार सावकारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख अशोक खेडकर, रवींद्र जाधव, जुलाल सोनवणे, राहुल जाधव, दीपक केदार, समाजसेवक जाकीर कुरेशी, सोनार मामा, प्रवीण पाटील, दयाराम वाघ, विद्यार्थी-पालक तसेच माजी नगरसेविका योजना ताई पाटील यांचे सहकार्य लाभले.
तसेच भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी दिनकर वाल्हे, रेखा वाल्हे, प्रभाकर पवार व प्रा. बी. एस. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
एकूणच, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, विचारशक्ती व वक्तृत्व कौशल्य विकसित होण्यास मोठी चालना मिळाली.
![]()

